अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना - Ahilyadevi Sinchan Vihir Yojana
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राबविण्यात येणारी एक महत्वाकांक्षी योजना आहे. अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला त्याच्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे अनुदान दिले जाते.
शेतकऱ्यांची शेती हि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते पण पावसाची अनियमितता पाहता शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी देणे शक्य होत नाही परिणामी पाण्याअभावी शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते ते टाळण्यासाठी राज्य सरकारने अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला जेणेकरून शेतकऱ्यांना शेत पिकासाठी कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता होईल व पाण्याअभावी शेत पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल.
महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तसेच अनियमित पाऊस, दुष्काळी परिस्थिती आणि दिवसेंदिवस भूगर्भातील कमी होणारी पाण्याची पातळी यामुळे शेतकरी हा कायम संकटात सापडतो. त्यामुळे शेतीला शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.
नवीन अपडेट: नवीन शासन निर्णयानुसार दोन विहीर मधील 150 फूट अंतराची अट रद्द करण्यात आलेली आहे.
| योजनेचे नाव | अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना |
|---|---|
| योजनेचे लाभार्थी | शेतकरी |
| योजनेचे उद्दिष्ट | विहीर खोदण्यासाठी अनुदान देणे |
| अनुदान | 4 लाखाचे अनुदान |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना सुरु करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट
- शेतकऱ्यांना शेतात विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना शेतात शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे.
- पाणी टंचाई कमी करणे आणि दुष्काळाचा सामना करण्याची क्षमता वाढवणे.
- शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणे.
- दुष्काळग्रस्त भागात पाणी उपलब्धता वाढवणे.
- शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- दुष्काळी आणि आत्महत्याग्रस्त भागात सिंचनाची सोय उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक आधार देणे.
- शेतीतून बारमाही उत्पन्न मिळू लागल्यास ग्रामीण भागातील तरुणांचे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवणे.
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेचे वैशिष्ट्य
- योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे.
- शेतकऱ्यांना अत्यंत फायद्याची अशी हि योजना आहे.
- शेतकऱ्यांचा सामाजिक विकास होण्यासाठी सदर योजना उपयुक्त ठरणार आहे.
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेचे लाभार्थी
- महाराष्ट्र राज्यातील लहान आणि मध्यम शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला त्याच्या शेतात नवीन सिंचन विहीर खोदण्यासाठी आणि तिच्या बांधकामासाठी सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.
- अनुदान रक्कम: अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
- टप्प्याटप्प्याने निधी वितरण:
- विहिरीचे खोदकाम सुरू करणे.
- अस्तर किंवा बांधकाम करणे.
- विहीर पूर्ण होऊन पाणी लागल्यानंतर अंतिम टप्पा. या सर्व टप्प्यांचे जिओ-टॅगिंग (Geo-tagging) करून मोजमाप पुस्तिकेत (MB Book) नोंद झाल्यानंतर निधी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात वर्ग (DBT) केला जातो.
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेचा शेतकऱ्यांना होणार फायदा
- शेतात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे शेतकरी वर्षभर सर्व प्रकारची शेती करतील.
- शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती क्षेत्राकडे आकर्षित होतील.
- दुष्काळाचा सामना करण्याची शेतकऱ्यांची क्षमता वाढेल व पिकांचे नुकसान होणार नाही.
- पाण्यासाठी पावसावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
- अनुदानाचा वापर विहीर खोदण्यासाठी आणि बांधकामासाठी करता येतो.
- मनरेगा कार्यक्रमाद्वारे मजुरांकडून विहीर खोदून घेतली जाते.
- पाणी संवर्धन आणि जल संधारण तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते.
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत प्रवर्ग
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
- भूसुधार योजनेचे लाभार्थी
- इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
- अल्प भूधारक व सीमांत शेतकरी
- परंपरागत वन निवासी
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत प्राथमिकता
- आत्महत्या कुटुंबातील सदस्य
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत पात्रतेचे निकष
- जमिनीची अट: अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर किमान 0.40 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
- पूर्वी योजनेचा लाभ नसावा: अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून विहिरीचा लाभ घेतलेला नसावा.
- दोन विहिरींमधील अंतर: प्रस्तावित विहिरीच्या जागेपासून ५०० मीटर अंतराच्या आत दुसरी कोणतीही सार्वजनिक किंवा खाजगी विहीर नसावी
- पाण्याची उपलब्धता: भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत तो भाग सुरक्षित घोषित केलेला असावा जिथे विहिरीला पाणी लागण्याची शक्यता आहे.
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेचे नियम व अटी
- शेतकऱ्याकडे कमीत कमी 2.60 हेक्टर स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे. त्या पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज नाकारले जातील. परंतु 3 अर्जदारांची जमीन सलग असल्यास अशा परिस्थितीत ते सामूहिक विहिरीसाठी अर्ज करू शकतात.
- जमीन शेतकऱ्याच्या नावावर असणे आवश्यक आहे. जर शेतजमीन दुसऱ्याच्या नावावर असेल तर त्या जमीन मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याची जमीन विहीर खोदण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक राहील
- अर्जदार शेतकऱ्याने या पूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाच्या द्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ मिळवला असल्यास अशा परिस्थिती पुन्हा त्या शेतकऱ्याला लाभ दिला जाणार नाही.
- शेतकऱ्याच्या शेतात विहीर असता कामा नये.
- अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
- ज्या जागी विहीर खोदायची आहे त्या ठिकाणापासून 500 फुटाच्या आजूबाजूच्या परिसरात कोणतीही विहीर असता कामा नये.
- शेतात विजेची सोय असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या 7/12 वर विहिरींची नोंद असता कामा नये.
- अर्जदार शेतकऱ्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे तसेच त्याने विहीर खोदण्याचे काम करून मजुरी घेणे आवश्यक आहे.
- जमीन कोरडवाहू असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याने मनरेगा कार्यक्रमात नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र: आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट
- पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल
- उत्पनाचे प्रमाणपत्र: सक्षम पदाधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्न दाखला
- फोटो: अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो
- शपथपत्र
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- जमिनीचा दाखला: जमिनीचा 7/12 उतारा
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत अर्ज करण्याची ऑफलाईन पद्धत
अर्जदार शेतकऱ्याला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना साठी अर्ज करावा लागेल.
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत
- अर्जदार शेतकऱ्याला महा DBT पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळालाभेट द्या.
- शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करा.
- वैयक्तिक माहिती आणि जमिनीचा तपशील भरा.
- सिंचन साधने व सुविधा या घटकाअंतर्गत 'सिंचन विहीर' हा पर्याय निवडा.
- विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि अर्जाची पावती जतन करा.
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत निवड प्रक्रिया आणि काम पूर्ण करण्याची पद्धत
- अर्जाची प्राप्त झाल्यानंतर कृषी अधिकारी आणि पंचायत समितीमार्फत अर्जाची छाननी केली जाते.
- लाभार्थी पात्र ठरल्यास त्याला विहीर खोदण्यासाठी शासनाकडून 'पूर्वसंमती पत्र' दिले जाते.
- पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्याने ठरवून दिलेल्या मुदतीत विहिरीचे काम सुरू करणे आवश्यक असते.
- कामाच्या प्रत्येक टप्प्यावर शासकीय अधिकारी भेट देऊन जिओ-टॅगिंग करतात. काम पूर्ण झाल्यानंतर मोजमापानुसार अनुदानाची उर्वरित रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाते.
अधिक माहितीसाठी:
योजनेचे नियम व अटी यांमध्ये बदल केला जाऊ शकतो त्यामुळे आमची विनंती आहे कि शेतकऱ्यांना योजनेच्या अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत पोर्टल वर किंवा तुमच्या जिल्ह्यातील कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
| Join Telegram Group | Click Here |
|---|---|
| अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना शासन निर्णय | Click Here |
| अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना अर्ज | Click Here |
| अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना प्रस्ताव | Click Here |
| Toll Free Number | 1800-233-1122 |