ई-पीक पाहणी का आवश्यक आहे? (ई पीक पाहणी चे महत्त्व)
महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ई पीक पाहणी मोहीम राबविली जाते.
या ई पीक पाहणी कार्यक्रम अंतर्गत शेतकरी DCS अँपचा वापर करून स्वतःच्या मोबाईल च्या सहाय्याने त्यांच्या शेतात लावलेल्या
पिकांची नोंदणी थेट '७/१२' उताऱ्यावर करू शकतात. पूर्वी ही नोंदणी करण्यासाठी गावातील तलाठ्यांवर अवलंबून रहावे लागत असे पण
आता शेतकरी तसेच गावात नेमून दिलेले सहाय्यक सदर ई पीक पाहणी करू शकतात.
ई पीक पाहणी चे महत्त्व, फायदे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे:

पूर्वी गावातील तलाठी प्रत्यक्ष शेतात जाऊन किंवा माहिती गोळा करून ७/१२ वर पिकांची नोंद करत असत. या प्रक्रियेमध्ये अनेकदा चुका होणे, वेळेवर नोंद न होणे किंवा पिकांची नोंद करणे राहून जाणे अशा तक्रारी येत असत. ई पीक पाहणी कार्यक्रमामुळे या सर्व समस्या आता दूर झाल्या आहेत.
- पारदर्शकता आणि अचूकता: शेतकरी स्वतः फोटो काढून GPS location च्या सहाय्याने पिकाची नोंद करतात, त्यामुळे नोंदणीमध्ये पारदर्शकता येते.
- शासकीय योजनांचा लाभ: नैसर्गिक आपत्तीमुळे (पूर, वादळ, दुष्काळ) पिकांचे नुकसान झाल्यास शासकीय आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ७/१२ वर पिकाची योग्य नोंद असणे अनिवार्य असते.
- वेळेची बचत: शेतकऱ्यांना पीक नोंदणीसाठी तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासत नाही.
ई पीक पाहणीचे प्रमुख फायदे
ई पीक पाहणीचे शेतकऱ्यांना मिळणारे प्रत्यक्ष फायदे खालीलप्रमाणे आहेत:
पीक विमा आणि नुकसान भरपाई:
- नैसर्गिक आपत्ती (उदा अतिवृष्टी, दुष्काळ, वादळ) आल्यास पीक विम्याची भरपाई मिळवण्यासाठी तुमच्या ७/१२ वर संबंधित पिकाची नोंद असणे आवश्यक असते.
- शेत पीक नुकसान भरपाईचा दावा करताना ई-पीक पाहणीचा डेटा पुरावा म्हणून वापरला जातो.
शासकीय हमीभाव खरेदी केंद्र
- शासनाच्या हमीभाव केंद्रांवर (उदा. कापूस, धान, सोयाबीन खरेदी केंद्र) माल विकायचा असेल तर ७/१२ वर पिकाची नोंद असणे सक्तीचे आहे.
कृषी कर्ज
- बँकांकडून पीक कर्ज किंवा इतर कृषी कर्ज घेताना तसेच अनुदान मिळवताना बँक अधिकारी ७/१२ वर पिकांची नोंदणी झाल्याची पाहणी करतात.
अचूक आकडेवारी
- राज्यात कोणत्या पिकाचे किती क्षेत्रात किती उत्पादन झाले आहे याची अचूक माहिती शासनाला मिळते. यामुळे एखादी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास नुकसान भरपाईचे नियोजन करणे सरकारला सोपे जाते.
ई-पीक पाहणी करताना घ्यावयाची काळजी
- अंतिम तारीख: खरीप आणि रब्बी हंगामासाठी शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीतच ई-पीक पाहणी पूर्ण करणे आवश्यक असते.
- GPS लोकेशन चालू ठेवा: शेताचा फोटो काढताना मोबाईलचे लोकेशन (GPS) चालू असणे गरजेचे आहे, अन्यथा फोटो सबमिट होत नाही.
- शेतातील योग्य क्षेत्र नोंदवा: तुमच्या गट क्रमांकातील उपलब्ध क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राची नोंद करू नका.
| ई पीक पाहणी शासन निर्णय 1 | Download | ई पीक पाहणी शासन निर्णय 2 | Download |
|---|---|
| ई पीक पाहणी शासन निर्णय 3 | Download |
| ई पीक पाहणी शासन निर्णय 4 | Download |
| ई पीक पाहणी शासन निर्णय 5 | पहा |
| E Pik Pahani Customer Care Number | 02025712712 |
| E Pik Pahani App | Visit |
| E Pik Pahani Website | Visit |
| E Pik Pahani Registration Process PDF | Visit |