Magel Tyala Saur Krushi Pump Yojana - मागेल त्याला सौर कृषी पंप योजना


राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा शेती हा पारंपारीक व्यवसाय आहे. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी हे दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात शेतकऱ्यांकडे शेती व्यतिरिक्त अन्य कोणतेच कमाईचे साधन नसल्या कारणामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते. त्यामुळे शेतकरी शेतीसाठी बँक, वित्तीय संस्था तसेच साहुकाराकडून जास्त व्याज दराने कर्ज घेतात व कष्ट करून शेती करतात. शेती करण्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते त्यासाठी शेतकरी विहिर, बोअरवेल, नदी, नाले, कालवा यामधून डिझेल पंपाच्या सहाय्याने पाण्याचा उपसा करतात परंतु राज्यातील लोडशेडिंगमुळे विजेची अनियमितता निर्माण होते व त्यामुळे शेतकऱ्यांना शेती सिंचन करण्यासाठी समस्या निर्माण होते.


आज सुद्धा राज्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज उपलब्ध नाही व महाग डिझेल पंप आणि वाढत्या डिझेल च्या किमतीमुळे शेतकऱ्यांना खर्चाच्या दृष्टीने डिझेल पंप विकत घेणे परवडण्यासारखे नसते. परिणामी शेतकऱ्यांना पाण्याचा उपसा करण्यासाठी वीज उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या हाथा-तोंडाशी आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. शेतकरी आधीच कर्ज घेऊन शेती करत असतो व पाण्याअभावी शेतीचे अशा प्रकारे नुकसान झाल्यामुळे त्यांना कर्ज फेडता येत नाही व त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात.


दिवसा लोडशेडिंग मुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नाही व रात्री विजेच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांना रात्री काळोखात शेती ला पाणी देण्यासाठी जावे लागते त्यामुळे रात्री जंगली जनावर शेकऱ्यांवर हल्ला करतात व त्यांना जखमी करतात तसेच साप, विंचू हे दंश करतात त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री सिचन करताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकार ने शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना (Magel Ttyala Saur Krushi Pump Yojana)सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर पंप बसवण्यासाठी 95% अनुदान दिले जाते त्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना स्वतःकडील फक्त 5% रक्कम भरावी लागते.


राज्यातील अनेक शेतकरी इलेक्ट्रिक पंपाने तसेच डिझेल पंपाने पिकांचे सिंचन करतात परंतु डिझेल पंप आणि विजेचे पंप पैशाच्या दृष्टीने खुप महाग असतात तसेच डिझेल पंपाला मोठ्या प्रमाणात डिझेल ची आवश्यकता असते व इलेक्ट्रिक पंपाला देखील मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता असते. त्यामुळे डिझेल आणि इलेक्ट्रिक पंप शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नसतात याउलट सौर पंप डिझेल आणि विद्युत पंपाच्या तुलनेत स्वस्त असतात तसेच सौर पंपाला डिझेल आणि विजेची आवश्यकता नसते त्यामुळे सौर पंप शेतकऱ्यांना परवडण्यासारखे असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.


मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 1 लाख सौर पंपाचे टप्या टप्याने वाटप करण्यात येणार आहे.


सर्व कृषीपंप ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी 63 केव्हीए / 100 केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र उभारण्यात येतात व त्या रोहीत्रावरील लघुदाब वाहिनीद्वारे कृषीपंपाना वीज पुरवठा करण्यात येतो. लघुदाब वाहिनीची लांबी वाढल्याने कमी दाबाने वीज पुरवठा होणे, विद्युत पुरवठयामध्ये वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा खंडीत होणे, तांत्रिक वीज हानी वाढणे, रोहीत्र बिघाड होण्याच्या प्रमाणात वाढ, विद्युत अपघात, विद्युत चोरी या सारख्या समस्यांमुळे अखंडीत व शाश्वत वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट साध्य होण्यास अडचणी निर्माण होतात.


याशिवाय, जेथे वीजेचे जाळे उपलब्ध नाही तेथे डिझेल इंधनाचा वापर करुनही कृषीपंप चालविले जातात. इंधनाची वाढलेली किंमत, आयातीवर होणारा खर्च, परकीय चलनात द्यावी लागणारी किंमत या बाबीही विचारात घेण्याजोग्या आहेत. याला पर्याय म्हणून राज्यात शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषीपंप उपलब्ध केल्यास वरील सर्व समस्यांवर मात करता येऊ शकते आणि त्याचे दृष्य स्वरुपातील फायदे पुढील काळात मिळतील, यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र मोठया प्रमाणावर राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला.


magel tyala Saur Krushi Pump Yojana

महत्वाच्या गोष्टी



शेतकऱ्याला दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व राज्य शासनाची पारंपारिक पध्दतीने कृषीपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चात व राज्य शासनाद्वारे सबसीडीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरीता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहीत 1 लाख सौर कृषीपंप टप्याटप्यात उपलब्ध करुन देण्याच्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेस या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली.


या योजनेअंतर्गत पुढील 3 वर्षांच्या कालावधीत टप्याटप्याने 1 लाख सौर कृषीपंप आस्थापित करण्यात येतील. पहिल्या टप्यात 25 हजार नग सौर कृषीपंप, दुसऱ्या टप्प्यात 50 हजार नग सौर कृषी पंप व तिसऱ्या टप्यात 25 हजार नग सौर कृषीपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.


योजनेचे नाव मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
लाभार्थी राज्यातील शेतकरी
लाभ 95% सौर कृषिपंप अनुदान
उद्देश्य सौर पंप विकत घेण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे उद्दिष्ट - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Purpose


magel tyala Saur Krushi Pump Yojana Saur Pump Setup

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे वैशिष्ट्य - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Features


मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे लाभार्थी - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Beneficiary


मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष


परिपत्रके / शासन निर्णय


परिपत्रके येथे क्लिक करा
शासन निर्णय येथे क्लिक करा

पुरवठादार यादी


पुरवठादार यादी येथे क्लिक करा

तक्रार निवारण


तक्रार नोंदवा येथे क्लिक करा
तक्रारीच्या स्थितीचा मागोवा घ्या (लाभार्थी) येथे क्लिक करा
सामान्य तक्रार नोंदवा येथे क्लिक करा

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदानाची रक्कम - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Subsidy


मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना होणारा फायदा - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Benefits


अटल सौर कृषी पंप योजना अंतर्गत वर्गवारी निहाय लाभार्थी हिस्सा

वर्गवारी लाभार्थी
हिस्सा
3 HP
लाभार्थी
हिस्सा
5 HP
लाभार्थी
हिस्सा
7.5 HP
लाभार्थी
हिस्सा
सर्वसाधारण 10% 16560/- रुपये 24710/- रुपये 33455/- रुपये
अनुसूचित जाती 5% 8280/- रुपये 12355/- रुपये 16728/- रुपये
अनुसूचित जमाती 5% 8282/- रुपये 12355/- रुपये 16728/- रुपये

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे भौतिक उद्दिष्टांचे वाटप व आर्थिक भार खालीलप्रमाणे आहे

पंपाचा प्रकार सर्वसाधारण
गटाचे
लाभार्थी
अनुसूचित
जातीचे
लाभार्थी
अनुसूचित
जमातीचे
लाभार्थी
एकूण नग पंपाची
आधारभूत
किंमत
आर्थिक
भार
(रुपये कोटीत)
3HPDC 4928 738 584 6250 255000 159,375
5HPAC 2957 443 350 3750 325000 121,875
5HPDC 11826 1772 1402 15000 385000 577,500
एकूण 19711 2953 2336 25000 - 858,75

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Eligibility


मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे नियम व अटी - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Terms & Conditions


मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Documents


मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे


मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Online Registration


मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्याची पद्धत - Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Application Status


मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत देयकाची रक्कम भरणा करण्याची पद्धत


मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पुरवठादाराची यादी बघण्याची पद्धत


मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत वारंवार विचारले जाणारे प्रश्न


प्रश्न 1.सौर कृषीपंप म्हणजे काय?
उत्तर: सौर कृषीपंप हा सुर्याच्या किरणांपासून म्हणजेच सौर ऊर्जेपासुन चालणारा पंप आहे. सौर पंपामध्ये मुख्यत: सोलर पॅनल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे तसेच इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे.

प्रश्न 2. सौर कृषीपंपाचा उपयोग काय आहे ?
उत्तर: सौर कृषीपंप हा शेततळे, विहिर, बोअरवेल इ. शाश्वत पाण्याचा स्त्रोत मधुन पाण्याचा उपसा करण्याचे काम करतो. उपसा केलेले पाणी हे पाईपद्वारे शेतातील पिकांना देण्यास मदत होते.

प्रश्न 3. सौर कृषीपंप कसा काम करतो ?
उत्तर: सौर कृषीपंप सौर ऊर्जेवर म्हणजेच सुर्याच्या किरणांपासून काम करतो. जेव्हा सुर्यकिरणे सोलर पॅनल्सवर पडतील तेव्हा डीसी उर्जा निर्माण होऊन सौर कृषीपंप कार्यान्वित होतो व पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो. कृषीपंप सौर ऊर्जेवर चालणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाकरीता योग्य आहे.

प्रश्न 4. पारंपारिक विद्युत पंपापेक्षा सौर कृषीपंप अधिक उपयुक्त कसे आहे ?
उत्तर:



प्रश्न 5. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना काय आहे ?
उत्तर: ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरीता पारंपारिक पध्दतीने विजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषीपंप आस्थापित करण्यात येणार आहेत.

प्रश्न 6. यापुर्वी सौर कृषीपंप योजना राज्यात राबविण्यात आली आहे काय ?
उत्तर: सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे महारष्ट्रात सन २०१५ पासून सौर कृषीपंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यापूर्वी अटल सौर कृषीपंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यात आली होती. तसेच सद्यपरिस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक - ब योजने अंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येत आहे. राज्यात दि. ०६.०९.२०२४ रोजी पर्यंत 2,63,156 सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना या सौर ऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर कृषीपंपा बाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे.

प्रश्न 7. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा फायदा कोणाला मिळणार आहे ?
उत्तर: ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपारिक कृषीपंपाकरीता वीजपुरवठा देण्यात आला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणकडे पैसे भरुन प्रलंबित असलेल्या शेतक-यांना प्राधान्य देण्यात येईल.

प्रश्न 8. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याची काय पध्दत आहे ?
उत्तर: या योजने अंतर्गत नवीन सौर कृषीपंप मिळण्याकरीता महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. वेबपोर्टलवरुन किंवा https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या link वर जाऊन, अर्जदारास A-1 अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. सदर अर्ज अगदी साधा व सोपा असून, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करवयाचे आहे.

प्रश्न 9. या योजने अंतर्गत अर्जासोबत कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत ?
उत्तर: शेतक-यांकडे असलेल्या शेतीचा 7/12 उतारा (जाल्स्त्रोताची नोंद आवश्यक आहे), आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र (अनुसुचित जाती/ जमाती लाभार्थींसाठी) या कागदपत्रांची सत्यप्रत आवश्यक आहे. अर्जदार स्वत: शेतजमिनीचा एकटा मालक नसेल, तर इतर हिस्सेदारांचा / मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे. पाण्याचा स्त्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त संपर्काकरीता ग्राहकांचा मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता (असल्यास), पाण्याचे स्त्रोत व त्याची खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.

प्रश्न 10. अर्ज केल्यानंतर अर्जाबाबतची माहिती कशी मिळेल ?
उत्तर: लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करताच अर्जदारास त्याचे मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील एसएमएस द्वारे कळविण्यात येईल तसेच विविध टप्प्यावर अर्जाची सद्य:स्थितीची माहिती अर्जदारास त्याचे मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. याव्यतिरिक्त, अर्जदारास वेबपोर्टलवर जावून लाभार्थी क्रमांकच्या आधारे अर्जाची सध्यस्थिती बघता येईल.

प्रश्न 11. सौर कृषीपंप लावताना जागेची निवड कशी करावी ?
उत्तर: सौर कृषीपंप पूर्ण कार्यक्षमतेने चालविण्यासाठी जिथे सूर्याची किरणे सोलर पॅनलवर पूर्णपणे पडतील, कुठल्याही प्रकारची सावली अथवा आडोसा त्यावर येणार नाही तसेच पॅनलवर धूळ, घाण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. सोलर पॅनल सूर्यकिरणांच्या दिशेने फिरण्यास वाव असेल अशा ठिकाणी बसविण्यात यावा तसेच जमिनीचा भूभाग हा समपातळीवर असावा. सोलर पॅनल शक्यतो पाण्याच्या स्रोताजवळ व अशा ठिकाणी लावावा जेणेकरून तो सहज स्वच्छ करता येईल. सोलर पंप हा सोलर पॅनेलच्या जवळच असला पाहिजे. परंतु ज्या क्षेत्रामध्ये सिंचन करावयाचे आहे त्याच क्षेत्रात असला पाहिजे.

प्रश्न 12. स्थापित केलेला सौर कृषीपंप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविणे शक्य आहे काय ?
उत्तर: एकदा स्थापित केलेला सौर कृषीपंप पुन्हा स्थापन करणे किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवणे योग्य नाही. शासन शुद्धीपत्रक दि. ०५.०३.२०२४ अन्वये, सौर कृषीपंप आस्थापित केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सदर सौर कृषीपंपाची विक्री अथवा हस्तांतरण करण्यास बंदी राहील. लाभार्थी शेतकऱ्यांनी अशा सौर कृषीपंपांची विक्री अथवा हस्तांतरण केल्यास त्यांचेविरुध्द महावितरण कंपनी यांचेद्वारे गुन्हा दाखल करण्यात येईल.

प्रश्न 13. सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी किती पैसे भरावे लागतील ?
उत्तर: सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडुन सौर कृषी पंप किंमतीच्या 10 टक्के रक्कम व अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांकडुन सौर कृषी पंप किंमतीच्या 5 टक्के एवढी रक्कम भारवी लागेल.

प्रश्न 14. सदर योजनेकरिता लागणाऱ्या सौर कृषीपंपाची क्षमता कशी निर्धारित करावी ?
उत्तर: या योजनेअंतर्गत २.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमतेचा, २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.

प्रश्न 15. सौर कृषीपंपाचे फायदे काय आहेत ?
उत्तर:

प्रश्न 16. नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच वीज, वादळ, गारा यामुळे सौर पॅनलचे नुकसान होईल काय? त्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे?
उत्तर: सध्या बाजारात उपलब्ध असलेले सोलर पॅनल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवले असून क्वचितच वीज, वादळ, गारा या नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे नुकसान होते. एखाद्याच दुर्मिळवेळी वीज पडल्यामुळे सौर पॅनेलचे नुकसान होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी सौर पंपासोबत वीज संरक्षण यंत्र (Lighting Arrestor) बसविण्यात येणार आहे.

प्रश्न 17. सौर कृषीपंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी किती असणार आहे ?
उत्तर: सदर सौर कृषीपंपाची देखभाल व दुरूस्तीचा कालावधी 5 वर्ष राहणार आहे. या कालावधीत सौर कृषीपंप नादुरूस्त झाल्यास दुरूस्ती व देखभालीसाठी निश्चित केलेल्या कालावधीत विनामुल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे. शेतकऱ्यांने सौर कृषीपंप नादुरूस्त झाल्यास महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राला तसेच संबंधित एजन्सीच्या ग्राहक सेवा केंद्राला तत्काळ कळविणे आवश्यक आहे.

प्रश्न 18. शेतकऱ्यांना कोणती दैनंदिन देखभाल करावयाची आहे ?
उत्तर: सौर कृषीपंपाला अत्यंत कमी देखभाल करण्याची आवश्यकता असते. साधारणत: सौर पॅनल वर कचरा किंवा धुळ बसल्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते. सौर पॅनलवरील धुळ वेळोवेळी व ओल्या कापडाद्वारे स्वच्छ केल्याने कार्यक्षमता योग्य राहते.

प्रश्न 19. सौर कृषीपंपाच्या साहित्याची चोरी झाली किंवा नुकसान झाल्यास काय करावे ?
उत्तर: सौर कृषीपंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास त्वरित त्याची तक्रार नजिकच्या पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवालाद्वारे (FIR) दाखल करावी. तसेच त्याची माहिती महावितरण कार्यालयास व संबंधित एजन्सीच्या ग्राहक सेवा केंद्राला देण्यात यावी. सौर कृषीपंपाचा 5 वर्षाकरिता पंप आस्थापित करणाऱ्या एजन्सीद्वारे विमा उतरविण्यात येतो त्यामुळे सदर लाभार्थींचा सौर पंप, विमा कंपनीकडून नुकसान भरपाई करीता पात्र ठरेल. विमा कंपनीकडुन नुकसानभरपाई करीता पंप आस्थापित करणारी एजन्सी सहकार्य करेल.

प्रश्न 20. सौर कृषीपंप नादुरुस्त झाल्यास शेतकऱ्यांनी कुठे तक्रार करावी.
उत्तर: सौर कृषीपंपाबाबत शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राकडे आलेली तक्रार संबंधित एजन्सीकडे पाठविण्यात येईल. सदर एजन्सीकडून शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल.

प्रश्न 21. अर्जदार शेतक-यास ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्यास काय करावे?
उत्तर: एखाद्दा अर्जदार शेतक-यास ऑनलाईनद्वारे अर्ज करण्यासाठी अडचणी आल्यास महावितरणच्या तालुका स्तरावरील उपविभागीय कायार्लयाशी संपर्क साधावा. याशिवाय महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अधिकृत पोर्टल येथे क्लिक करा
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पत्ता हॉंगकॉंग बँक बिल्डींग,
एम. जी. रोड, फोर्ट,
मुंबई - 400 001
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना संपर्क 1800-212-3435
1800-233-3435